कामगारांची सामाजिक सुरक्षितता
सध्याच्या काळात जागतिक स्तरावर होणार्या विविध बदलांचा परिणाम म्हणून मानवी जीवनाशी निगडित सर्व बाबींमध्ये असुरक्षिततेत वाढ होत आहे. यात जीवनाची, रोजगाराची अशा अनेक बाबींचा समावेश होतो. यादृष्टीने उद्योगात काम करणार्या विशेषकरून असंघटित कामगारांच्या दृष्टीने ‘सामाजिक सुरक्षितता’ हा महत्त्वपूर्ण विषय आहे. देशात कल्याणकारी राज्य प्रस्थापित होण्यासाठी देशातील प्रत्येक स्तरातील नागरिकांना आर्थिक न्यायाची हमी दिली आहे. ही जबाबदारी केवळ सरकारची नसून, ती कामगारांच्या दृष्टीने उद्योग संस्थांचीसुद्धा आहे. ‘सामाजिक सुरक्षितता’ प्रत्येक कामगारास अत्यावश्यक असून, उद्योगात कार्यरत असंघटित कामगारांच्या दृष्टीनेही अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. नेमका हाच आधार घेऊन सदरील पुस्तकात कामगारांच्या सामाजिक सुरक्षिततेवर व त्यांच्या परिमाणांवर प्रकाशझोत टाकला आहे.