बाळुभाई मेहता यांचे स्वातंत्र्य चळवळीतील योगदान
जगात अनेक अप्रसिद्ध व अज्ञात लोकांनी भल्याभल्यांना चकीत करून सोडणारी कामे केली आहेत अशा लोकांमध्ये बाळुभाई मेहतांचा समावेश होतो. ‘खानदेशचे गांधी’ म्हणून ते महाराष्ट्राला परिचित झाले. प्रसिद्धीच्या झगमगाटापासून लांब राहून त्यांनी आपले सर्व आयुष्य सामान्य माणसांच्या सेवेत घालविले. तुरूंगात असतांनाच विनोबाजींकडून त्यांना ग्रामसेवेची दिक्षा मिळाली. अस्पृश्यता निवारणाकडे त्यांनी विशेष लक्ष दिले. तेलघाणी, सुतकताई, वृक्षारोपण करून ग्रामोद्योगाचे महत्त्व लोकांना पटवून दिले.