आपले संविधान, आपला सन्मान
भारतीय राज्यघटना हे जगातील सर्वात मोठे लिखित संविधान आहे. समता, बंधुता, स्वातंत्र्य व न्याय तसेच प्रज्ञा, शील, करुणा व मैत्री या मूल्यांची राज्यघटनेत बीजे रोवून भारताच्या संविधानाची निर्मिती करण्यात आली. ती भक्कम असली की आपणही एकमेकांना संघटीत असू. म्हणून तिचे संरक्षण करण्यासाठी आपण सदैव तत्पर असले पाहिजे यासाठी हा छोटासा प्रयत्न आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे पंचवीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजीचे ऐतिहासिक भाषण आपल्याला सदैव मार्गदर्शन ठरेल असे मला वाटते म्हणून आवर्जून त्याचे काही मुद्दे यात दिले आहे. मी काही या पुस्तकात माझे स्वतःचे काही देत नाही तर ते एक संकलन आहे. प्राथमिक शाळा ते प्रौढ यासर्वांसाठी ते नक्कीच वाचनीय आणि उपयोगाचे ठरणार आहे.
आपले संविधान, आपला सन्मान!
प्रत्येक नागरिकांच्या मनामनात संविधानाप्रति अभिमानाचा जागर चेतवू या. संविधान जागरण अभियानात सामील होऊ या! आपण आपल्या कोणत्याही कार्यक्रमात हे पुस्तक भेट म्हणून देऊ या.
राजेंद्र काशीनाथ पारे