G-२० ची उपयुक्तता आणि भारत
G-२० परिषदेच्या आयोजनाची संधी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फार मोठ्या आत्मविश्वासाने आणि भविष्यकालीन अशा दूरगामी सकारात्मक परिणामांचा विचार करून स्वीकारली. २०१४ पासून नरेंद्र मोदी यांचे परराष्ट्र धोरण हे भारतासाठी अतिशय उपयुक्त ठरले आहे. बलाढ्य अशा राष्ट्रांच्या या संघटनेमध्ये भारतासारख्या तुलनेने छोट्या राष्ट्राची पकड ही मजबूत होत आहे. भारत हा पूर्वीपासून शांततावादी आणि अहिंसात्मक तत्वांचा विचार करत आला आहे. नरेंद्र मोदी यांनी यजमान पद स्वीकारतांना आपल्या भाषणात शांततेचा पुनरुच्चार करीत ही युद्धाची वेळ नाही तर शांततेची वेळ आहे, असे परखड बोल रशियाला सुनविले. अन्न टंचाईचा प्रश्न असेल, ऊर्जेची समस्या असेल किंवा आर्थिक मंदीचे संकट असेल या सर्व जागतिक समस्यांना सोडविण्यासाठी भारत निश्चितपणे पुढाकार घेईल आणि विश्वाचे कल्याण आपल्याबरोबर होईल.
- श्री. राजेश पांडे
सल्लागार समिती सदस्य, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ. पुणे