भारतीय अर्थव्यवस्था १९८० पासून (भाग १ )
‘भारतीय अर्थव्यवस्था १९८० पासून (भाग १)’ वर नवीन बदलासह पण तितकाच समजण्यास सोपा असेल असा हा संदर्भ, मुख्यतः कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव अंतर्गत बी. ए भाग २ सेमिस्टर ३ च्या अभ्यासक्रमावर लिहिला आहे. परंतु महाराष्ट्रातील निरनिराळ्या विद्यापीठांच्या एम. ए. व बी. ए. वर्गासाठी अभ्यासक्रमात सुधारणा केली गेली आहे. जवळपास महाराष्ट्रातील सर्वच विद्यापीठात भारतीय अर्थव्यवस्था या संबंधित पेपर आहेत. नवीन शैक्षणीक धोरणामध्ये अद्ययावत अभ्यासक्रम तयार करण्यात आला. त्या समस्याची जाणीव लक्षात घेऊन व अन्य विद्यापीठांच्या सुधारित अभ्यासक्रमातील सर्व विषयांचा ऊहापोह प्रस्तुत ग्रंथात केला आहे. त्याच अनुषंगाने प्रस्तुत ग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले आहे.