खानदेशातील गढ्यांचा इतिहास
प्रस्तुत पुस्तकात खानदेशातील जवळजवळ पाऊणशे गढ्यांचा अभ्यास करून अतिशय चांगली माहिती संकलीत केलेली आहे. ही माहिती संकलीत करीत असतांना इतिहासाचे स्थळानुरूप जे चार प्रकार पडतात त्यात जागतिक इतिहास, राष्ट्रीय इतिहास, राष्ट्रीय इतिहास, प्रादेशिक इतिहास व स्थानिक इतिहास यापैकी त्यांनी सध्या ते ज्या खानदेशात रहातात त्या स्थानिक (खानदेशच्या) इतिहासाला महत्व दिलेले आहे. खानदेशातील गढ्यांचा अभ्यास करतांना गढी म्हणजे काय? गढींची निर्मिती कोणी? व का केली? गढ्यांच्या निर्मितीची कारणे कोणती? गढी व किल्ला यातील साम्य व भेद, गढ्यांची वैशिष्ट्ये, महत्व, गढ्यांचा र्हासाची कारणे कोणती ? त्यावर काही उपाययोजना करता येईल का? दुर्लक्षित खानदेशातील गढ्यांकडे ऐतिहासीक वास्तु म्हणून पाहिले जाईल का व त्यांना ऐतिहासिक पर्यटन स्थळ म्हणून मान्यता मिळेल का? अश्या अनेक प्रश्नांची उकल लेखकांनी या पुस्तकात केलेली आहे. खानदेशातील गढ्यांचा अभ्यास करतांना ओघानेच खानदेश नावाची उत्पत्ती, खानदेशाचे स्थान व विस्तार, खानदेशाचा भुगोल व भू-भाग, खानदेशातील जनसंस्कृती, खानदेशाची राजकीय पार्श्वभूमी, खानदेशातील बोलीभाषा अश्या अनेक घटकांचाही - इतिहास उजेडात आणला आहे.