भारतीय लोकशाहीतील वाटचाल
भारतात ब्रिटीश वसाहतींसोबत नवा विचार, नवीन मूल्ये, नवीन व्यवस्था या उदारमतवादी मूल्यांचा प्रभाव भारतीयांवर पडला. यातूनच आपण संसदीय लोकशाहीचा स्वीकार केला. भारतीय लोकशाही समजून घेण्यासाठी संविधानातील तरतुदी व संविधान सभेतील चर्चाविश्वाचा परामर्श घेतल्याशिवाय भारतीय लोकशाहीचे आकलन पुढे सरकू शकत नाही. भारतीय लोकशाहीची वाटचाल याविषयी मांडणी करतांना लोकशाहीची जगभरातील स्थिती, नंतर भारतातील स्थिती, त्या स्थितीची वाटचाल, त्या व्यवस्थेची अंगे अन उपअंगे, त्यावर होणार्या बाह्यघटकांचा प्रभाव, व्यवस्थेचे अंतर्गत पर्यावरण, तिची संरचना, कार्यपद्धती, तिच्यातील अंतर्गत घटक, काळानुसार त्यात होणारेबदल, व्यवस्थेची उपांगे, वाटचालीतून वृद्धिंगत होणारे नवीन प्रवाह, नवे बदल, इत्यादी बाबींचा विचार प्रस्तुत ग्रंथात विविध अंगांनी अभ्यासकांनी मांडलेला आहे.