आपले शहर आपला इतिहास
जळगाव जिल्ह्यातील यावल हा तालुका इतिहासाच्या पाऊलखुणा असलेला तालुका आहे. या तालुक्याने प्राचीन काळापासून वेगवेगळ्या राजवटी पहिल्या तालुक्यात धार्मिक पर्यटन क्षेत्रात व्यास मुनी तसेच मनुदेवीचे अनन्य साधारण महत्त्व आहे. तालुकावासीयांचेच नव्हे तर जिल्हावासीयांचे आराध्य दैवत, कुलदैवत, कुलस्वामीनी म्हणून मनुदेवीला मान्यता आहे. यामुळे पौराणिक, धार्मिक, अध्यात्मिक उर्जेची भूमी म्हणून यावल तालुक्याचे नावलौकीक आहे. मध्ययुगीन कालखंडामध्ये रावधार निंबाळकर यांच्या भूईकोट किल्ल्यामुळे यावल प्रकाशझोतात होते. मध्ययुगीन कालखंडातील मोठी व्यापारीपेठ असलेले सुरत शहर आणि बुर्हाणपूर शहर या दोन शहरांना जोडणार्या रस्त्यावर यावलचा हा किल्ला असल्यामुळे यावलला फार महत्त्व होते. इंग्रजी आमदनीमध्ये सुद्धा स्वातंत्र्यसैनिकांच्या प्रखर राष्ट्रभक्तीमुळे तसेच ग्रामीण भागातील काँग्रेसच्या पहिल्या राष्ट्रीय अधिवेशनामुळे यावल फैजपूरसह यावलचे नाव देशाच्या पटलावर चमकले होते. स्वातंत्र्यानंतर मधुकरराव चौधरी, जे.टी.महाजन, रमाबाई देशपांडे, रमेश चौधरी, हरीभाऊ जावळे, शिरीष चौधरी या व्यक्तींनी यावलचे प्रतिनिधीत्व करुन तालुक्यात विकासाची गंगा आणण्याचा प्रयत्न केला. या सर्व बाबी सदरील पुस्तकांत संकलीत करुन ते पुस्तकरुपाने प्रकाशीत करण्याचा प्रयत्न
केलेला आहे.