विमुक्त महिलांचे विश्व
भारतीय राज्यघटनेनुसार स्वातंत्र्यानंतर विमुक्त जातीच्या कल्याणासाठी करण्यात आलेल्या विविध कार्याची मांडणी पुस्तकातील वेगवेगळ्या प्रकरणात देण्यात आलेली आहे. भारतीय राज्यघटनेच्या परिच्छेद ३४१ व ३४२ अन्वये विमुक्त जातीतील महिलांच्या कल्याणकारी योजनेची माहितीचे स्वरूप, महिलांच्या सामाजिक, आर्थिक व मानवी अधिकाराचे अतिशय उत्तम सादरीकरण करण्यात आलेले आहे. विमुक्त व भटक्या जाती जमातीत जात पंचायती असल्यामुळे जातीतील प्रत्येक निर्णय जसे की, विवाह, घटस्फोट, संपत्तीचे वाद, व्यवसायावरून होणारे वाद, इतर भांडण व तंटे याविषयी न्याय निवाडा जातपंचायतीत केल्याची माहिती या पुस्तकात देण्यात आलेली आहे. तसेच विमुक्त जातीतील महिलांच्या सक्षमीकरणासाठी शासन दरबारी व अशासकीय संस्थेच्या कार्य प्रणालीचे विशेष स्वरुप मांडलेले आहे. डॉ. फरिदा खान यांनी ‘विमुक्त महिलांचे विश्व’ या पुस्तकातील आशयातील मजकूर हा वास्तविक परिस्थिती व यथार्थ परिस्थितीशी समायोजन दर्शविणारा आहे.