संत शिरोमणी तुकाराम महाराज
महाराष्ट्राचे संस्कृती पुरूष तुकाराम महाराज यांचे अभंग मराठी मनाचा चिरंतन आविष्कार आहे आणि तो ज्ञानदेव - नामदेवांपासून उत्क्रांत होत आलेल्या मराठी अभंगांचा उत्कर्ष आहे. साडेतील शतके उलटली तरी आजही त्यांचे अभंग आपल्या मनाला स्पर्श करून जातात याचे कारण म्हणजे मानवी मनाचा तळ धुंडणारी आणि माणसाच्या जगण्यातील ताणतणाव सुक्ष्मपणे टिपणारी त्यांची असाधारण प्रतिभा आपले स्वायत्त आत्मविष्काराचे माध्यम आणि आपल्या आत्मभानाचे माध्यम अभंग हेच राहिले हे जीवनध्येय ठरविले. सामूहिक मनाची अचूक संवेदना पकडणार्या अभंगाला नैतिक परिणाम असल्यामुळे त्यांची प्रतिभा अधिक वृद्धिंगत होते आणि हेच त्यांच्या प्रतिभेचे बलस्थान आहे.