भारतीय साहित्य विचार
भारतीय साहित्य विचाराला आपल्याकडे फार मोठी परंपरा आहे. भामह, दंडी वामन, रुद्रट, जगन्नाथ, आनंदवर्धन यासारख्या संस्कृत मीमांसकांनी याची मांडणी केली आहे. हा भारतीय साहित्य विचार मराठी साहित्यात गं.त्र्यं.देशपांडे, वा.ल.कुलकर्णी, रा.भा.पाटणकर, दि.के.बेडेकर, प्रा. गो. म. कुलकर्णी, वि. ना. ढवळे, प्रा. मु. सु. पाटील, रा. ग. जाधव, कल्याण काळे, सुरेश धायगुडे, सुरेश जोशी, भालचंद्र फडके, अरविंद वामन कुलकर्णी, लीला गोविलकर, द.दि.पुंडे, स्नेहल तावरे, वसंत पाटणकर या नामवंत अभ्यासकांनी अधिक मूलगामी तसेच अधिक सुलभ करून साहित्याच्या अभ्यासकांसमोर मांडला. साहित्य शास्त्राची उत्तम जाण आणि त्याला मूलभूत जीवन विचारांची जोड दिल्यामुळे हा भारतीय साहित्य विचार मराठी साहित्यात बहुआयामी झाला.