पुणे ते कन्याकुमारी सायकल साहस यात्रा
बहुदा प्रवास तरुण, निसर्ग व सृष्टिसौंदर्य पाहण्यासाठी करतो. निवृत्त व्यक्ती देवदर्शन करून पुण्यप्राप्तीच्या हेतूने करतो. पण, येथे या प्रवासवर्णनात एक तर्हेचे साहस होते ते श्री. सोपान बोराटे सरांचे. निवृत्त झाल्यानंतर लहान स्कूटरने पुणे ते कन्याकुमारी व तेथून बंगळुरू असा प्रवास करण्याचा, त्याहीपेक्षा चि. किरणचे पुणे ते कन्याकुमारी सायकलने जाणे, हे मोठे साहसच होते. दररोज १०० ते १२५ किलोमीटर असा प्रवास त्याने सायकलने केला. सोबत त्याला वडिलांनी (बोराटे सरांनी) साथ दिली. परतीचा प्रवास रेल्वेने केला. सर्व प्रवास अर्थातच निर्धोक, सुखरूप झाला. प्रवास करताना आज येथे, तर उद्या तेथे धावणंच होतं. त्याचे वर्णन त्याहीपेक्षा धावते. कारण, ते काव्यरूपात लिहिले आहे. काव्यप्रकार असा असतो की, शब्द थोडे आशय मोठा, त्याचा प्रत्यय प्रवासात आलेल्या चांगल्या - वाईट अनुभवांचे वर्णन करताना सरांनी फारच चांगला केल्याचे दिसून येतो.