ऑलिम्पिक पदक विजेत्या भारतीयांची यशोगाथा
विशालता हा ऑलिम्पिक स्पर्धांचा महत्त्वाचा गुण आहे. संपूर्ण जगातून आलेले पाच-सहा हजार खेळाडू आणि लाखभर प्रेक्षक तिथे जमतात. संपूर्ण जगाचे प्रातिनिधिक रूप तेथे अवतरलेले असते. संपूर्ण जगातील लोकांना एका माळेत गुंफण्याचे कार्य या स्पर्धा करतात. या स्पर्धांच्या माध्यमातून जगभर एकात्मतेचे वातावरण निर्माण होते आणि त्यामुळेच या स्पर्धांमधील विजयी खेळाडू हे देखील विशेष असतात. सर्वसामान्य विद्यार्थ्यांना सहज समजेल, अशा शैलीत या पुस्तकाची मांडणी केलेली आहे. भारतीय हॉकीच्या सुवर्णकाळातील दुर्मिळ अशी छायाचित्रे देखील खेळाडूंच्या नावासह यात दिलेली आहेत. लेखकाने 'ऑलिम्पिक पदक विजेत्या भारतीयांची यशोगाथा' या पुस्तकातून भारताच्या क्रीडा क्षेत्रातील हिरोंची कामगिरी समाजापुढे मांडली आहे. यातून अनेक होतकरू खेळाडूंना प्रेरणा मिळेल. तसेच क्रीडा क्षेत्रातील कार्य करणाऱ्या संघटक, प्रशिक्षक, पंच अधिकारी यांनाही उपयुक्त अशी माहिती मिळेल. शारीरिक शिक्षण अभ्यासक्रमातील एक अत्यंत महत्त्वाच्या भागाविषयी विद्यार्थ्यांना या पुस्तकाच्या माध्यमातून माहितीचा खजिना मिळेल.